Thursday, 19 June 2014

House !

House !
What is a House ? What makes it beautiful, comfortable, cozy, shabby, clean ? Is it a space, light, noise, colors, furniture, people ?  

In architectural terms, everything. And in philosophical terms, everything + something. I would like to share only one aspect out of all above which I am thinking last many months. It is about Inward looking house and outward looking house.

When we say we stay in a flat, we are generally talking about inward looking space where most of the things which we refer beautiful or ugly are INSIDE the house. It is very difficult to comment on anything outside as we do not have control on it. Expect we are supper lucky (Rather supper rich) to have a beach / mountain view right in front of our terrace, we all get opportunity to have a more or less similar houses forcing to look inside and comment on it.

In auroville, we get opportunity to stay in most of the house where everything outside is extremely beautiful and you have very less control on making inside of the house the way you like. Totally opposite to typical FLAT system, we get readymade fully furnished houses without any choice to change anything inside but they strongly promote to look outside and comment. Generally, half of the house is just a (semi covered) terrace where dining, living, wash area, sitting, shoe rack, storage and all such activities take place. As security is not a issue, except a small piece of wardrobe, nothing is lockable or even closed. Surrounding is generally full of forest with zero vision from any nearby house which automatically makes it outward looking house.

In inward looking houses (in flats), you mandatorily need to texture paint specific wall, hang some posters, add few artifacts, play a bit in material and colors, etc. etc. because those are really strong points of a beautiful house in this context. Also, it becomes important which portion of the house you see from entrance, which portion is hidden, how much spacial feel the room gives you, how much light comes in and how far can you carry it. Again, this is only day time we are talking about. In evening, the house becomes 100% inside looking with all lights on, T.V. on, and windows closed for mosquitos ! 

In outward looking houses (in Auroville or some bungalows), you can decorate interior intensively, but hardly anything is noticed. (It is my opinion after staying in 6 houses in Auroville and more than a dozen houses in Pune). I think, the reason is - if a human being is given an option to see any man made beauty against any natural beauty, he has tendency to choose natural beauty. So, even if there are beautiful art pieces on the table and expensive light fixtures, we generally ignore it if there are beautiful dense trees, beach etc. outside. I think, we always like to connect with the nature inside our mind even if we need to disconnect from it in our day to day life.

Whenever we visit our friends houses (flats), we start comparing it with ours and aspire to have things which we like. Mostly, everything is about interior elements. Then somehow we come to temporary conclusion which house we like the most. Me too. But, when I return to Auroville and compare it with Pune, that temporary conclusion is failed even if the houses in Auroville do not have any facilities, textured walls, expensive furniture, curtains, cushions, L.C.D. or anything which is present in all our friends houses by default. The only difference which overpowers these parameters is that we are 1000 times more connected to nature. I am almost staying in a forest with minimum needed shelter and privacy.

This gives lot of food to my brain when I think to design and build my own house. Again, this is ONLY 1 parameter and there are hundreds of things in architectural terms which are important for a house. We can discuss them one by one.

संपूर्ण ध्येयवाद आणि विशिष्ट ध्येयवाद !

संपूर्ण ध्येयवाद आणि विशिष्ट ध्येयवाद !
(गेल्या १० वर्षात लग्न झालेल्या सर्वांसाठी )

हल्ली आपण मुलांना आय पॅड वापरायला शिकवतो , जोय स्टिक वापरायला शिकवतो , कधी कधी शुभं करोति सुद्द्धा शिकवतो . पण ध्येयवाद ह्या नावाखाली येणारं काही शिकवतो का हे जरा बघूया . हि काही फार मोठी गोष्ट नाही बर का ! रोजच्या जीवनात करायच्या किंवा न करायच्या गोष्टींची एक सूची म्हणजे ध्येयवाद , असं प्रबोधिनीत शिकवलेलं मला आठवतं . संपूर्ण ध्येयवाद म्हणजे स्वत्व विसरून संपूर्ण आयुष्य कोणत्या तरी (निस्वार्थी) ध्येयाला अर्पण करणे …! हा प्रकार स्वातंत्र्य मिळाल्यावर इंग्रजांसोबत भारत सोडून गेला आणि त्याची आजच्या काळात मुलांना घडवताना गरजहि नाही . पण विशिष्ट ध्येयवाद हा मात्र कालातीत असतो. आणि म्हणलं तर सोप्पा , म्हणलं तर अति अवघड असतो. कधीच खोटे बोलू नये , कधीच चोरी करू नये , दारू काधिहि  पिऊ नये , वगैरे सोप्प्या पण आजच्या काळात करायला जड जाणाऱ्या गोष्टी म्हणजे विशिष्ट ध्येयवाद ! आपल्या आई , वडिलांनी आजी आजोबांनी आपल्याला हेच शिकवलं कारण ह्या गोष्टी त्यांनी कधीच केल्या नव्हत्या आणि अश्या लहान लहान पण महत्वाच्या गोष्टीतला विशिष्ट ध्येयवाद त्यांनी अचूक पाळला होता . आपण आपल्या मुलांना फार फार तर  "शक्यतो खोटे बोलू नये" , "शक्यतो चोरी करू नये" , "दारू कधीकधीच प्यावी" इतपतच सांगू शकतो कारण इंटरव्यू ला का होईना , आपण खोटं बोललो आहोत , proxy मारून का होईना , अर्ध्या दिवसाची रजा कधी न कधी चोरलेली आहे . mocktail मधून का होईना , दारू पिलेली आहे . मग हे सगळं आपल्या मुलांना आजच्या (आणि २० वर्षानंतरच्या ) काळात करावं लागणार हे आपल्याला माहीतच आहे . मग अशी कोणती एकतरी गोष्ट आहे कि जी आपण पुढच्या पिढीला ठणकावून सांगू शकतो ?? जरा विचार करुया. आता ध्येयवाद नसला तर काय नुकसान होतं ?? बहुतेक काही नहि. पण जर असला , तर मात्र काहीतरी फायदा नक्की होत असतो . जगात ८५ % लोक दारू पितात , तर दारू का पिऊ नये ? आणि ती का वाईट ?? ……माहित नाही . पण महत्वाचं हे हे आहे कि दारू हे (भारतात तरी ) मोहाचं प्रतीक आहे. आणि ती न पिणं  हे आपल्याला मोह टाळण्याची शिकवण देत असतं . दारू पिउन संसार उध्वस्त झालेली अनेक उदाहरणं आहेत , पण ओठाशी आलेला ग्लास चव न घेता खाली ठेवल्यामुळे वाचलेले संसार कसे मोजणार ??? 

आपली आई उपास करायची . आजही करते . आपण बाबांसोबत त्याची कधी कधी चेष्टा सिद्ध केली असेल , कधी तिला पित्त झाल्यावर प्रेमानी रागावलो सुद्धा असु. पण आईनी उपास करायचा सोडल्याचं उदाहरण फारच कमी . त्यांनी काय पुण्य मिळतं ? माहित नाही . पण एक गोष्ट आपण आयष्यात ठरवली आणि ती वाट्टेल ते झालं तरी पाळली ह्यचा समाधान मात्र प्रचंड मिळतं. हा सुद्द्धा एक विशिष्ट ध्येयावाद्च !  आपण स्वतः अशी कोणती गोष्ट करतो हे स्वतःलाच विचारून बघूया . लक्षात घ्या , ह्याचा आपल्या आयुष्यात जेवढा फायदा होतो , तेवढाच देशाला सुद्धा नकळत होत असतो .आपल्यापैके अनेक जण जपान , जर्मनी , इंग्लंडला जाऊन आले असतील . त्या देशातले लोक कुठली गोष्ट कटाक्षांनी पाळतात का , त्यांच्यामध्ये विशिष्ट ध्येयवाद आहे का हे जरा बघितला तर असं लक्षात येईल कि "हो" , प्रत्येक देशाची एक विशिष्ट गोष्ट आहे जी त्या देशाचे बहुतेक सर्व नागरिक जपतात , त्याचा विशिष्ट ध्येयवाद बनतो आणि त्या सामुहिक ध्येयवादाच रुपांतर देशप्रेमात होतं . थोडक्यात , दिलेली वेळ पाळणं हा जर्मन लोकांचा गुण सर्वश्रुत आहे . "मी कधीही वेळेचा अपमान करणार नाही , आणि सगळीकडे वेळेतच जाईन " असं एक नाही , दोन नाही , …। सर्व जर्मन माणसांनी ठरवल्यावर आणि तसा अनेक पिढ्या केल्यानंतर त्या देशाच्या लोकांनी देशाची प्रतिष्ठा ह्या एका विशिष्ट बाबतीत ऊच्च दर्जाला नेउन ठेवली . आणि नकळत त्याचा देशाच्या विकासात प्रचंड फायदा झालाच .  इंग्लिश लोकांची शिस्त , जपानी लोकांची काम करायची चिकाटी हे सर्व गुण वैयक्तिक पातळीवर ठरवलेल्या विशिष्ट ध्येयवादाचं एकत्रित रूप आहे . 

आपल्या पिढीबद्दल बाहेरच्या देशातल्या लोकांची मतं काय आहेत हे मी कुणाला सांगण्याची गरज नाही . पण आपण स्वतः कोणता ध्येयवाद आचरणात आणतो , आपल्या मुलांना कोणता ध्येयवाद शिकवतो , आणि तसा सर्वांनी केल्यावर २० वर्षांनी आपली पुढची पिढी कशी वागते , ह्यावर देशाचा विकास काही प्रमाणात नक्कीच अवलंबून आहे .  आपल्या पिढीतल्या धडाडी , नवीन शिकण्याची आस , कुठल्याही परिस्थितीत काम करायची तयारी अश्या काही चांगल्या गोष्टी पुढे नेउन सामाजिक उदासीनता , डोळ्याला झापड लाऊन चालायची वृत्ती , बेशिस्त वगैरे वाईट गोष्टी टाकून देऊन पुढच्या पिढीत जर कुठला लहानसा ध्येयवाद जरी पेरू शकलो तरी भारतीयांकडे बघण्याच्या दृष्टीकोनात बाहेरील देशांमध्ये बराच फरक पडेल . आणि आपल्यालाच त्याचं खूप समाधान मिळेल . आपल्याला जे मिळाला नाही (आणि तरी आपलं फार नुकसान झालं नाही ) ते मुलांना देण्याच्या प्रयत्नात आपण त्यांना बराच काही चांगलं  नक्की देत आहोत , पण त्यासोबत आपल्याला जे मिळालं (आणि ज्याचा आपल्याला खूप फायदा झाला ) ते मुलांना द्यायचं राहून तर जात नाही न , एवढ  बघितलं  तरी ध्येयवादाचं  बीज आपण त्यांच्यात पेरलं असा मला वाटतं !

Thursday, 12 June 2014

माझा गुरु हरवलाय !



गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू …… हा श्लोक शाळेत असताना म्हणायचो तेव्हा 'आई - वडील, शाळेतल्या एखाद्या आवडत्या बाई, तबल्याचे सर, पेटी शिकवणाऱ्या काकू, कुणीतरी डोळ्यासमोर यायचं. पण कोलेजात गेलो तेव्हा पासून असलं सगळं बंद झालं. 
एक तर हा श्लोक किती वर्षात म्हणलाच नाही , आणि म्हणलाच तेव्हा डायरेक्ट 'ब्रह्मा' किंवा 'विष्णु' या व्यतिरिक्त कुणी दिसलंच नाही. 

दहा वर्ष झाली , कुणाचे पाय धरावे असं कुणीच सापडलं नाही ?? …. मनाला पटत नाही . कदाचित मोठ्या झालेल्या आमच्या शरीराला कुणाचे पाय पकडण्याचा मनाचा मोठेपणाचा विचार मानवला नसेल . आई वडील , घरातले वयस्क ह्यांपैकी हक्काच्या (ज्यांना सुभाषिता मध्ये गुरु म्हणलय ते हक्काचे) गुरूंना सुद्द्धा आपण गेल्या दहा वर्षात किती वेळा साधा नमस्कार केला , ते आठवावं लागेल . आपली पिढी वाया गेली , आपला खूप चुकलं असा मी अजिबात म्हणत नाही , पण कुणाचे पाय धरले असते तर जास्त समाधान वाटलं असतं असा विचार तिशीच्या उंबरठ्यावर मनाला चाटून जातो इतकंच !

खास करून संगीतामध्ये, खेळात काही छान करणारी मित्र मंडळी अशा लोकांना बघून जाणवतं कि एखाद्या क्षेत्रातले गुरु सुद्धा शिष्याच्या संपूर्ण आयुष्यावर कसा प्रभाव पाडतात . काय आणि का असतो हा प्रभाव नक्की ??

पुस्तकी व्याख्येप्रमाणे : "आपल्याला आपला शिक्षण, त्यातून मिळणारं कौशल्य , नंतर त्यातून मिळणारी नोकरी आणि पैसा ह्या गोष्टी एक 'माध्यम' पुरवत असतात , जगण्यासाठी एक 'साधन' पुरवत असतात . पण 'साध्य' नाही ! आपल्याला कोणतीही गोष्टी कशी हवी आहे , कशी मिळणार आहे , ह्याचा DNA ह्या माध्यमातून व्यक्त होत असतो. पण आपल्याला 'काय' सध्या करायचंय ह्या गोष्टीचा विचार गुरु सोबत जास्त परिपक्व होत जातो . 'गुरुसारखं बनायचं' हि एक सुप्त इच्छा  'कसं बनायचं नाही' ह्याची सूत्र सुद्धा पक्की करून घेत असते आणि तेच म्हणजे आयुष्यातलं 'साध्य' . ते पक्क असलं , कि मग इतर अनेक गोष्टी मिळाल्या नाहीत , तरी समाधान नक्की मिळतं आणि मनाची चलबिचल होत नाही . "

पण मला इतका अवघड कळत नाही . इतकंच कळतं कि मनात खूप गोंधळ झाला तर पटकन १० मिनिट जाउन मन मोकळं  करता येईल आणि त्या १० मिनटातून उपाय शोधेल अशी व्यक्ती मी हरवून बसलोय . आई वडील हे सर्वोच्च गुरु असतातच , थोडक्यात सुप्रीम कोर्ट ! पण त्या कोर्टात जाण्या आधी मार्गदर्शक , मित्र , बंधू , हित चिंतक , निंदक असलेला गुरु मात्र मी हरवलाय . 

अनिल अवचटांची एक गम्मत सांगतो . त्यांना वयाच्या पन्नाशीत भूगर्भ शास्त्र शिकायची हुक्की आली . आता कसं शिकणार  ?? एवढ्या मोठ्या माणसाला विद्यापीठात प्रवेश घेऊ देईनात , मानानी असलेलं मोठेपण कुणाला प्रश्न विचारू देईना , पुस्तकं वाचली तर काही कळेना …. मग त्यांचे एक जवळचे मित्र डॉ. करमरकर प्रसिद्ध भूगर्भ शास्त्रज्ञ होते . त्यांच्या घरी दुपारी चहाला गेले आणि म्हणाले, "मी तुमच्याकडे रोज दुपारी १ तास येईन , तुम्ही गप्पा न मारता मला Geology शिकवा . आणि पुढे २ वर्ष त्यांच्या सोबत वाटेल तिथे फिरत राहिले आणि पुष्कळ ज्ञान मिळवलं. कधी ते ओरडले , कधी चिडले , कधी वैतागले , पण अवचटांनी अजिबात त्याचा राग मानला नाही आणि चिकाटी सुद्धा सोडली नाही. तुमच्या एखाद्या जिवलग मित्राला गुरु बनवून त्याकडून शिकण्याचा धाडस आहे आपल्यात ??? बोलताना सोप्पं वाटतं , पण मित्रांसमोर कमीपणा घ्यायला ५६" छाती लागते . 

अनिल अवचट , पु. ल. ,सलील कुलकर्णी , व्यंकटेश माडगुळकर अशा संवेदनशील लोकांची चरित्र वाचून असा दिसतं कि त्यांना वयाच्या साठीत सुद्धा कुणाचे पाय पकडण्यात कमीपणा वाटला नाही . बघूया , आपल्याला हे समाधान मिळतंय का "समोर कोणी का असेना , मी कोणाचंच आयुष्यात कधी ऐकलं नाही" हे म्हणण्यात आपण समाधान वाटून घेणारे ते !!!

हर्षद