अपेक्षा
वनवासातही राम तसाच होता, अयोध्येतही तसाच
प्रेमळ
महालातील सीताही तशीच होती, पर्णकुटीतही तशीच
शांत
प्रेमळ रामाने, शांत सीतेला हरीण आणावं अशी अपेक्षा आली
तेव्हा रामायण झालं
आम्ही कालही तसेच वागलो, उद्याही तसेच
मनस्वी
जगाने कालही तेच केलेत, आजही तेच करणार
तेजस्वी
मी तेजस्वी, आणि जगाने मनस्वी वागायची अपेक्षा आली,
की महाभारत होणार !
गावकरी आधीही तसेच राहिले, आणि नंतरही तसेच
अजागळ
साहेब आधीही तसाच होता, अन् नंतरही तसाच
बिलंदर
बिलंदर प्रश्नांना अजागळ उत्तर द्यायची तुझी अपेक्षा आली
आणि स्वतंत्र झालो
कशातून?
No comments:
Post a Comment