कालच्या विचारांना लागला वणवा
अर्धवट करपले बरेच,
न करता विचार की हवे कोणते, नको कोणते
भस्मसात झाले बरेच,
नव्या विचारांच्या बिया सांडल्या मनभर
रुजले नवे रोपटे अनेक,
अंकुरले अचानक काही कोंब
भलतेच तरारले अनेक,
नसता लागला वणवा तर बरं,
म्हणाले जुने खरेच,
वणव्या शिवाय आपलं खरं नव्हतं
म्हणाले नवे खरेच,
जुन्याचा मागमूस नाही नव्यात
नव्याचा गंध नव्हता जुन्यात
म्हणाले बरेच, म्हणाले बरेच !!!
No comments:
Post a Comment