परत काय लिहिणार,सगळं तर आधीच लिहून ठेवलंय
नवीन काय सांगणार,सगळं तर केव्हाच सांगून झालंय
तरीही लिहिणारे लिहितात,वाचणारे वाचतात
सांगणारे सांगतात,ऐकणारे ऐकतात , पण कळतंय कुणाला ?
ज्ञानेश्वरांपासून गांधीजींपर्यंत सगळ्यांनी तेच तेच सांगितलं
पण आधीच कळलं असता,तर पुढच्यांना चावायला काहीच उरलं नसतं
मला सुद्द्धा कुणाला काहीच सांगायचं नाहीये
खरतर सांगायला काहीच उरलं नाहीये
पण करायचीच कविता असा ठरल्यावर मग काय,
भाषा जरा बदलली,शब्द केले इकडे तिकडे
वृत्त बित्तात बसेना,म्हनला नवशिक्यांना मुक्ताछंदच बरा
बघता बघता पानं भरली,भराभर कविता झाली
चाऊन चाऊन चोथा झाला,तरी विषय ठरलेलाच आहे,
............माणुसकीचे तत्वज्ञान !!!
No comments:
Post a Comment