Wednesday, 20 February 2013

लोकमान्यांचा प्रश्न ...!!!

सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?????

१०० वर्षापूर्वी आमच्या गुरुंनी हा प्रश्न विचारला होता आणि स्वातंत्र्य मिळून ६० वर्ष झाली तरी हाच प्रश्न विचारावा लागतोय .
तेव्हा परके लोक राज्य करीत होते आणि आता आपलेच लोक राज्य करतायत त्यामुळे आजची परिस्थिती जास्त खेदजनक आहे.

मुघल साम्राज्य वाईट ... कारण ते जनतेची पिळवणूक करतात लूट करतात..आया बहिणींची अब्रू लुटतात.....ते घृणास्पद प्रकार करणार्यांना पाठीशी घालतात....
शिवाजी महाराजांनी त्याविरुद्ध लढून जे स्वराज्य उभा केला त्यात असा काही घडू नये म्हणून महाराज रक्त आटवत होते...गुन्हेगारांना त्वरित कडक शिक्षा करीत होते...

जेव्हा परकीय राज्य उलथवून एखादा राष्ट्र स्वतंत्र होते, तेव्हा हे सर्व थांबेल अशी एक सर्वसाधारण अपेक्षा असते कारण राज्य करणारा राष्ट्राला आपला घर मानत असतो, किंबहुना ते त्याचा घर असत.
पण हजारो लोकांचे प्राण देऊन मिळवलेल्या राष्ट्राचे राजे जेव्हा तेच जुलूम तीच नपुंसकता दाखवतात तेव्हा असा प्रश्न पडतो कि गेल्या १०० वर्षात आपल्या आबा पणजोबांनी लढून काय मिळवला...
आधीच बर होतं ... फार त्रास देणाऱ्या इंग्रज गोर्याला गोळी घालून ठार तरी करता येत होतं ... आता ते सुख सुद्धा नाही.. ब्रीतीशान्पेक्षा नीच वागनार्यावर काळे झेंडे घेऊन मिळमिळीत निषेध व्यक्त करण्या पलीकडे आपण काहीच करू शकत नाही...
आणि तो पण आपल्याच घरासमोर.. राष्ट्रपती भवनासमोर जावा तर आपल्यालाच तुरुंगात टाकतात... अरे ...जे व्हायचा ते झालं ...गेली....१२ च्या भावात मेली ती मुलगी .... इथे लोक दंगा करतील म्हणून सिंगापूरला नेउन मारला तिला..
आणि एकाही कॉंग्रेस नेत्याला घराच्या ए.सी मधून बाहेर येउन लोकांशी साधा बोलावस सुद्द्धा वाटला नाही.. एकून माज असा होता कि जणू सगळे लोक दिवाळी बोनुस मागायला जमलेत..... १० दिवस देशाच्या राजधानीतली तरुण पिढी आपापले काम धंदे सोडून एका मुलीला न्याय मिळावा म्हणून काही सांगायला आलेत तर त्यांचा म्हणणं १-२ तासात ऐकून त्यावर कारवाई करून सगळ्यांना दिलासा देण्याचा काम होतं ह्या नेत्यांचा.. १० दिवस १०००० लोकांचे कामाचे तास ह्या महामूर्ख, निर्लज्ज आणि कोडग्या नेत्यांमुळे वाया गेले ... एका मुलीचा जीव गेला. तो घेणारे सहीसलामत सुटणार  हे सगळ्यांना आत्ताच दिसतंय... कारण तसाच चाललंय गेली ५० वर्ष....

ह्या सगळ्या बातम्या येईपर्यंत अजून १५-२० मुलींवर अत्याचार झाले....त्याची तर बातमी पण छापू नका म्हणून वर्तमान पत्रांनाच दम भरला... हि लोकशाही नसून भारतीय लोकांच्या बुरख्यातली ब्रिटीश राजावातीपेक्षा भयंकर दडपशाही आहे...
हि  घटना आहे असा नाही....ह्या म्हातार्या लोकांनी  खूप गोष्टीत शेण खाल्लाय...आपण तरी किती बोलून तोंड खराब करणार...शेवटी आपणही बोलणार बोलणार आणि फेसबूकिंग करणार....

No comments:

Post a Comment