मित्रांनो,
आजच सकाळी तमिळ लग्नाला जायचा योग आला. एकाच मंदिरात अंदाजे १0-२0 लग्न लागली असतिल. काही तमिळ मित्रांच्या माहितीनुसार त्या मंदिरातली लग्न शक्यतो पळून आलेल्या नवरा नवरीची असतात. आणि उरलेली गरीब घरातली असतात.
जोडप्याला 'कव्हर' म्हणजेच पाकिटात घालून पैसे (च) द्यायचे असतात. पाकिटावर ज्याला देतो त्याचा नाव न लिहिता जो देतो त्याचा नाव आणि रक्कम लिहितात (?). माझ्या पाकिटावर "रश्मी - २०० /- अस लिहिल गेल. (हाहाहा). हे पाकीट नवर्याच्या हातात दिल्यावर तो कुठे ठेवतो हा प्रश्नच आहे म्हणा…(लुंगीला खिसे नसतात न…)
आमच्या सोबत परदेशी मित्र मंडळी होतॆ. १0-२0 लग्नांच्या जोड्यांपैकी एका जोडप्याने काहीही संबंध नसताना परदेशी मुलींसोबत फोटो काढले (!)
प्रदर्शनात असतात तसले गाळे होते बाहेर. मग कळल कि ते प्रत्येक लग्नाचा एक, असे जेवायचे मंडप आहेत. बसायला जागा नाहि. टेबलावरून थाळी उचलायची, उभ्या उभ्या भरभर जेवायच, आणि घरी जायचं !
शिरा, इडली, सांबार, पोंगल, आणि वडा असा मेनू होत…. (कोणाच्याही घरी अचानक टपकले असते तरी हेच मिळाला असतं) …
अशा पद्धतीने लग्नाच्या जेवणात पण इडलीच खाउन हा सोहळा (जेवणासकट) सकाळी ७ ते ९ मध्ये संपला !!!
- रश्मी हर्षद मेहेंदळे
- रश्मी हर्षद मेहेंदळे
No comments:
Post a Comment