Tuesday, 19 March 2024

मिलिग्राम मोजणाऱ्या तराजूत, खोलीत पसरलेल प्रेम मोजून, 
फुटपट्टीत उचंबळणाऱ्या भावना मोजल्या, 
तळव्याच्या उबेची दोन थेंब सल्फुरिक एसिड टाकून 
लिटमस टेस्टने खात्री करून टिपण वहीत नोंद केली, 
तापमापिने दिवसभरातल्या आठवणी तपासून 
खास अमेरिकेहून मागवलेल्या गाईड बुका प्रमाणे नीट मांडल्या, 
आणि सगळी माया जागच्या जागी आहे 
याची खात्री करून मगच "आजीच्या गोधडीत" शिरलो . .... 
... हो ना, शिस्त म्हणजे शिस्त, नियम म्हणजे नियम !!! 

आशीर्वाद

देवासमोर नमस्कार करायला गेलो ऐकलं, 
हे केलं की तो आशीर्वाद देतो 
आशीर्वाद कसा दिसतो, कसा वास येतो? 
कसा ह्या आशीर्वादाचा आवाज येतो ? 
कुणाला जाणवलंय, ह्याचा स्पर्ष कसा असतो? 

पण न मागता मिळालेल्या आशीर्वादाला गृहीत धरून 
त्याची अवहेलना, दुर्लक्ष, अनुपयोग आपण करत असतो. 
सुन्दर अक्षर घडवणाऱ्या शाळा आहेत, 
पण "आमच्या इथे फटाफट, उत्कृष्ट कविता सुचवून मिळतील" 
अशी जाहिरात कुठे पहिलीत? 

अशा कलागुणांचा आशीर्वाद नमस्काराच्या आधीच मिळतो ! 
रंगसंगती, निसर्गवेड, सूर ओळखणे, 
डोळ्यातून जीवलगाच्या भावना समजणे, 
ह्या सगळ्या आशीर्वादाने मिळालेल्या कलांना कोणी बाजूला सारतो, 
आणि लौकिक अर्थात लाभणाऱ्या कौतुकास जगत राहतो. 

मी आता नमस्कार करणं थांबवतो. 
आहे त्यास पुरेसा न्याय देऊ शकलो, 
की मग पुढचं मागणं मागुया , असा निश्चय करतो.

पुढचा प्रवास

अवघड माथ्याकडे चिंताक्रांत नजरेने पहात, 
काटेरी झुडुपात पायवाटेने, थकून, 
तहानेने कोरड्या पडलेल्या घशाने, दुखऱ्या पायाने जात असताना, 
हलकीशी वाऱ्याची झुळूक आल्यावर, 
विश्रांती साठी काही क्षण कडेच्या दगडावर बसल्यावर, 
काही ध्यानी मनी नसताना 
तळहातावर एक शुभ्र पांढऱ्या रंगाचं, 
काळया ठिपक्यांच फुलपाखरू अलगद बसलंय, 
हे मिनिटभराने मला कळलं ! 

उठून पुढे चालू लागलो तेव्हाचा ताजेपणा, 
बसल्यावर पायाला मिळालेल्या विश्रांतीमुळे, 
वाऱ्याची झुळूक आणि घोटभर पाण्यामुळे, 
की तळहात न हलवता एकाग्रतेने 
फुलपाखराची हालचाल टिपत त्याच्याशी मनोमन मैत्री केल्यावर, 
माथ्याची चिंता मिटून, आता वाटेतल्या पावला गणिक दिसू लागलेल्या 
सुंदर वेली फुलांकडे पाहत होत असलेल्या प्रवासामुळे ? 

थोडावेळ हलकेच उडत, काही पावलं सोबत करत, 
स्थूलातल्या निश्चयापेक्षा सुक्ष्मातल्या सौंदर्याकडे पाहायची दृष्टी देऊन, 
आणि पुन्हा दिसेल, पुन्हा हातावर बसेल, ही निरागस आशा मनात जागवून, 
झुडुपात ते फुलपाखरु निघून गेलं ! 

त्या भेटीने, ना माझा रस्ता बदलला, ना माथा. 
ना सोबतचे वाटसरू बदलले, ना परिस्थिती. 
पण अमुलाग्र अन् कायम स्वरुपी बदलून गेला तो ... पुढचा प्रवास ! ....
माझा.... आणि त्या पांढऱ्या-काळया ठिपक्यांच्या....फुलपाखराचा !

निःशब्द

उडवा लाथेने चांदण्या, गुलाब कचऱ्यात फेका 
कवितांची पुस्तके भिजवा, रंगाची डबी जाळा ! 
झरे, फुलपाखरे, मंद झुळूक दरीत ढकला 
पौर्णिमेचा चंद्र तर रॉकेल टाकून पेटवा ! 

सुंदरता, नाजुकता, अलवार पणा या शब्दात वा शब्दांच्या प्रतिमेत नाही... 
हे शब्द, त्यांची चित्रं, त्याचे उच्चार, 
व भाषेच्या प्रभुत्वाने केलेली गहिऱ्या शांततेवरील मात 
म्हणजे मनातली भावना नाही... ! ती निःशब्द, अबोल, निराकार आहे !!!!

या फिर कुच ओर?

पानी की बूँद है जरुरत, 
छत का साया है सुकून, 
प्यार की आहट है विलास, 
..... या फिर कुच ओर ? 

 पैसा हि पैसा है जरुरत, 
ग्यान है सुकून, 
अकल है विलास, 
..... या फिर कुच ओर ? 

 जिंदा रेहना है जरुरत, 
दोस्त मिलना है सुकून, 
गुरू दीक्षा है विलास, 
..... या फिर कुच ओर?

किष्किंधा सम्राट !

इ.स. ३००० मधल्या पाठ्य पुस्तकातला लेख.. जवळपास हजार वर्षापूर्वीची गोष्ट मला चीन देशाच्या दक्षिण टोकाला असलेल्या हंपी या पुरातन गावात फिरताना वाचनात आली. या भागात किष्किंधा सम्राट म्हणून ओळखला गेलेल्या एका दयाळू, शूर तसेच बुद्धिमान राजाची गोष्ट महान ऋषी मुनिवर राजमुळी या तपस्वीने लिहिली आहे. महाराज बाहुबली हे अमरेंद्र, राजेंद्र, धर्मेंद्र, शरद चंद्र बाहुबली अशा अनेक विशेषणांनी ओळखले जातात. बाहेरच्या शत्रूंशी सामना करायची वेळ न येता कुटुंब कलहातच शौर्य, बुध्दी आणि आयुष्य पणाला लागलेल्या या महान नायकाने आपल्या भावाचा (की काकाचा की पुतण्याच्या ते लिहिलेली पाने हरवलेली आहेत) नायनाट करून स्वतःच्या आईला (की बायकोला) सोडवून कहर पराक्रम केला. (कहर हा शब्द ४०० वर्षा पूर्वी शब्द कोशात टाकलाय) . आजही ह्या राज्याचे अवशेष एके काळच्या तेलंगण राज्याच्या (आज मलेशिया देशाच्या) उत्खननात सापडलेल्या एका शहरात सापडतात. पुढे वालमिकी, व्यास वगैरे अनेक जणांनी या गोष्टीचे स्वतःच्या भाषेत भाषांतर करताना या बाहुबली ला हनुमान अशी एक अनाकलनीय उपमा देऊन काल्पनिक गोष्टी रचल्या आहेत. पण चीन देशाच्या चिकित्सक लोकांनी त्याला प्रमाण न मानता रजमुळी या मुनिंची कथा अतीपश्चिमात्य डिजिटल मोहोर (या शतकातला जागतिक महत्त्वाचा मान्यता प्राप्त चायनीज प्रदेश, ज्यात ली एक लहानशी स्वातंत्र्य देवता मूर्ती नेस्तनाबूत केल्याबद्दल उगाचच निंदा झाली) उमटवली आहे. तरी इतिहास शिकणाऱ्यांनी याच भागात लिहिल्या गेलेल्या कालिदास, राम, हनुमान, शंकर वगैरे अंधश्रद्धात्मक पात्रांचा उल्लेख परीक्षेत केल्यास त्यांना अदृश्य करण्यात येईल (तसही कुणालाही चीन देशांत अदृश्य करता येतच).

वो दो आँखे मुझे क्यूँ घूर रही है !

वो दो आँखे मुझे क्यूँ घूर रही है? 
पूंच रही है सवाल, या दे रही है जवाब 
बुला रही है, क्यूँ की "यहाँ खाइँ है?" 
या तफा कर रही है, क्यूँ की "वहां खतरा है?" 

वो दो आँखे मुझे क्यूँ घूर रही है? 
रोक रही है जानेसे, या कर रही है रुकने को मना, 
मेरे अंदर के भगवान को ललकार रहा है शैतान? 
या मेरे शैतनियात को अगवा कर रहा है भगवान! 

वो दो आँखे मुझे क्यूँ घूर रही है? 
मेरी आखों मे धूंड रही है खुद को 
या दिखा रही है मुझे आईना? 
मैं रोज गुजरता हू ओर ये मुझे आज देख रही है? 
या रोज मुझे देखती है जिस मैं आज मेहसूस कर रहा हुं? 

वो दो आँखे मुझे क्यूँ घूर रही है !
काही लोकांची पहिली भेट झाल्यावर सुध्धा अनेक वर्षांनी काही कारणांनी मैत्री होते तर काही लोकांची आधी घट्ट मैत्री असते आणि मग अनेक वर्षांनी काही कारणांनी पहिली भेट होते रंगुनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा गुंतूनी गुंत्यात साऱ्या, पाय माझा मोकळा घेऊनी मृद्गंध झाला, श्वास माझा वेगळा बांधूनी नात्यात साऱ्या, हात माझा मोकळा न्हाऊनी पाण्यात साऱ्या, प्रवाह माझा वेगळा आसमंती उडून साऱ्या, पंख माझा मोकळा
सगळं कसं चोख, रेखीव मोजून, तपासूनच ठेवायचं असतं का ? तुमची माझी मापटी वेगळी, कवितांचे अर्थ "केवढ्याला" मध्ये कसे सांगणार? माझी मैत्री निभावण्याची रीत, व्यवहार, नियम व पद्धतही वेगळी, तुमचे वजनाचे तराजू, माझ्या अत्तराचा घमघमाट कसा मोजणार ? वजन, उंची, वय आणि अंतर यात मैत्री मोजणारे तुम्ही, अनवट नात्यातल्या आश्वस्त करणाऱ्या हातांची ऊब कशी मोजणार ? चोरटी नजरानजर, हसताना पडलेली खळी, डोळ्यातलं आर्जव या सगळ्याची किंमत, उपयोग आणि गरज कशी ठरवणार?

भांडण

डोळ्यांनी मेंदूला फसवून भलतीकडे पहिलं, 
मेंदुने मनाला फसवून भलतीच आठवण काढली, 

मनाने मेंदूला फसवून भलताच भाव आणला, 
भावनेने डोळ्यांना फसवून भलतेच अश्रू आणले ! 

अश्रूंनी गालांना फसवून भलतीच वाट धरली, 
गालांनी ओठांना फसवून एकीकडे खळी आणली, 

खळी ने डोळे झालं गेलं विसरून गेले, 
डोळ्यांनी मेंदुला फसवून....... मिठी घट्ट केली !!
फाटकन जाऊन अस्सा मेरू पर्वत आणला 
धाडकन ओरबाडून कल्पवृक्ष लोळवला 
गंधर्वाना हरवलं युध्दात अन् 
कमरेत वाकवून अफझलखान आणला 

बोला, आजची कमाई ? 
मेरू पर्वत उचलला, महासागर प्यायलो आगीतून चाललो, भूमंडळ धावलो 

अरे वा, यातलं स्वप्नात काय आलं? 
"............................. ते स्मितहास्य"

वर्तुळाकार भेट

स्वतः च्या मस्तीत, शीळ घालत, माझ्या आड वाटेवरच्या घरासमोर चालणाऱ्या एका सत्तरीतल्या माझ्याच ऊंचीच्या एका तरुणाच्या खांद्यावर थोपटून मी हाक मारली. 

प्रश्न पडला होता ,"कधी पाहिलं नाही, भेटलो नाही, विचारावं, 
काय केल्यानी मी अजून तीस वर्षांनी सुद्धा एवढाच तरुण राहू शकेन बरं?" 

त्याने वळून बघितलं आणि हुबेहूब माझ्यासारखा दिसणारा तो मला स्मितहास्य करून म्हणाला 
"विशेष नाही अरे , फक्त तीसेक वर्षापूर्वी मला रस्त्यात जाताना एक तडफदार म्हातारा भेटला होता 

आणि म्हणाला की असा प्रश्न रोज विचारात जा" ... त्याचं ऐकलं!
पंडितजींच्या शरीरात प्रवेश केलेली सतार त्यांच्या बोटातून तिला हवं ते ऐकवत होती, का सतारीच्या आत बसून पंडितजी तिच्या तारांमधून त्यांना हवं ते वाजवून घेत होते, हे कळण्या आधीच गालांवरच्या रोमांच आणि अश्रूंनी भानावर आलो !